Skip to main content

मागे वळून पाहताना 😊

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

एकाच आयुष्याची "सेकंड इंनिंग" म्हणजे सेवानिवृत्ती. सेवा निवृत्त झालेला मनुष्य जरी त्याच्या सेवेतून मुक्त झाला असला तरीही त्याच्या त्या अनुभवाची व एकंदरच कार्यक्षमतेची त्या व्यक्तीच्या कुटुंबाला गरज. ज्या सेवेच्या बदल्यात इतकी वर्षे आपण आपले कुटुंब चालवले मुलं लहानाचे मोठे केले त्याच सेवेतून निवृत्त होणे म्हणजे काळजाचे पाणीच होणे आहे.परंतु हा एक अपरिहार्य दिवस असतो. काही जण म्हणतात की माणसाने तेव्हाच निवृत्त व्हावे जेव्हा वरचाचे बोलावणे येईल खरे आहे काम तर शेवटच्या क्षणापर्यंत करावे लागते परंतु कोणत्या कामात कुठे थांबावे हे महत्वाचे नाही का? योग्य वेळी थांबणे हे सुद्धा एक कौशल्यचं आहे ते सर्वांना जमेलच असे नाही.

आजच्या जीवनात पैसे कमविणे सोपा आहे माणसं कमविणे कठीण आहे. मोजके उदाहरण सोडले तर कुणाला सहसा हे सुख लाभत नाही.  या जगात कोण कोणाला ऐकत. या जगात सर्वात कठीण काही असेल तर ते कोणाला ऐकणे. शिक्षक मात्र याला अपवाद.

आज दिनांक 31 मे 2025 रोजी वडील, श्री. श्रीराम राजधर पाटील हे शिक्षण क्षेत्रातून 32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर उपशिक्षक या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. माध्यमिक शिक्षक म्हणुन त्यांनी 32 वर्ष शिक्षण क्षेत्रात अविरत सेवा दिली. 

आज त्यांच्या या कारकिर्द बद्दल मनापासून लिहावे असे वाटत आहे. या लेखणी मागे त्यांची शिक्षक म्हणून पार पाडलेली एक भूमिकेचा भाग या पत्राद्वारे मांडत आहे. 

12 जून 1993 साली वडिलांनी उपशिक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रात पदार्पण केलं. B.Sc - B.Ed ही त्यांची शैक्षणिक पदवी. विज्ञान व गणित हे त्यांचे शिकवण्याचे विषय. ज्या वेळी या क्षेत्रात पदार्पण केल त्यावेळी या क्षेत्राचा उतरता काळ सुरू होता. सुरवातीचे दिवस हे खूप हाल अपेष्टातून गेले. मूळगाव मूडी तालुका. अमळनेर ते कर्मभूमी तावखेडा प्र. बे. तालुका. शिंदखेडा हा सुरवातीचा प्रवास रोजचा असायचा. मूडी ते बेटावद व वर्षी ते दभाषी रोज पायपीट तिथून पुढे काही वाहन भेटला तर त्याने शाळा गाठायची हा नित्यक्रम. आठवड्यातून 3-4 दिवस तावखेडा येते मुक्काम असायचा व वीकेंड ला घरचा रस्ता. सुरवातीचे सुमारे 14 वर्ष (1993-2007) खूप जिकिरीची होती. 14 वर्ष विनापगारी वडिलांनी शाळेला सेवा दिली. संयम काय असतो हे यातून शिकण्याजोगे आहे असे मला नेहमी वाटते. पुढे याच काळात 3 वर्ष न्यायालयीन लढा लढला व जिंकला. आणि या सर्व संघर्षातून वाट काढत एक यशस्वी जीवनाचा आदर्श आम्हसर्व समोर उभा केला. 

या प्रवासात अगणित अडचणी आल्या त्या व्यक्तिगत वा व्यवहारिक या रूपात. एका शिक्षकाचे जीवन हे सोपे कदापि नसते. कुठेतरी वाचनात आले होते, शिक्षक आजीवन शिक्षक असतो तो कधीही माजी होत नाही, फक्त शासकीय नियमाने तो सेवानिवृत्त होत असतो. या प्रवासात अनेक महत्वपूर्ण भूमिका बजावत एक यशस्वी शिक्षकाचे आयुष्य पूर्णत्वास त्यांनी नेले. या काळात लोकसभा, विधानसभा निवडणूक ड्यूटी, दहावी बोर्ड परीक्षा मंडळ, अभ्यासमंडळ इत्यादी हे कामी ही आवडणीने पार पाडली. या प्रवासात ज्या अडचणी त्यांनी अनुभवल्या त्या मला शब्दात मांडता येण्या इतपत सोप्या नक्कीच नाहीत, त्या आम्ही आणि त्यांचा सोबत असणारे व त्यांना ओळखणारे लोक यांनी अनुभवले आहेत. या सर्व प्रवासात त्यांना खूप मोलाची अशी पाऊलोपावली कोणाची साथ लाभली असेल तर पत्नी सौ. वैशाली श्रीराम पाटील यांची. ज्या संस्थेत आणि ज्या शाळेला, व गावावर अविरत सेवा केली त्यांनाही भरभरून दिले. 

त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शिक्षण क्षेत्रात आपण देखील काम करून पहावे व त्याबद्दल अनुभव घ्यावा असे माझे प्रांजळ मत आणि मी ते सिनिअर कॉलेजला Lecturer म्हणून अनुभवून बघितले. उपशिक्षक या पदावर काम करत असताना अनेक कडू-गोड प्रसंगाना ते सामोरे गेले. उमेदीच्या काळात त्यांनी जीव ओतून काम केलं. पडतीच्या काळात धीर धरून मोर्चा सांभाळला आणि आज यशस्वी रित्या सेवा पूर्ण केली. 

या 32 वर्ष सेवेच्या काळात मला त्यांची कुठली एक गोष्ट कायम स्मरणात राहील ती अशी की, शेतीसाठी त्यांची आवड कधीही कमी झाली नाही. स्वतः शेती करणे आणि आवडीने करणे हा कार्यक्रम. या बद्दल देखील खूप काही आठवणी आहेत. शाळा आणि शेती हा नित्यक्रम नियमित आजगायत त्यांनी सुरू ठेवला आहे. निवृत्ती नंतर अजून आवडीने शेती कडे वळणे हा पर्याय त्यांनी आवर्जून पुढे ठेवला आहे. त्यांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात कधीच 

या 32 वर्षाचा कार्यकिर्दीत त्यांनी केली अनेक चढउतार पाहिले महत्वाचं म्हणजे खुप चांगली माणसं जोडली. आज का कुणास ठाऊक, त्यांच्याबद्दल लिहताना अंतःकरण जड झालंय. कारण, रोज ठरलेली दिनचर्या उद्यापासून पूर्णविराम घेणार आहे. त्यांचा जीवनपट व कार्यपट त्यांच्यापेक्षा अधिक तळमळतेने कोणीही मांडू शकत नाही. या लेखणीतून मी छोटा प्रयत्न करून त्यांचा शिक्षण क्षेत्रातील सेवेबद्दल त्यांचे मनस्वी आभार करतो व पुढील आयुष्य सुदृढ, निरोगी आणि आनंददायी जावो यासाठी आई एकविरा चरणी प्रार्थना करतो. 

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

.. आपलाच.. 

गौरव श्रीराम पाटील ✍🏽

Comments

Popular posts from this blog

MY COLLEGE JOURNEY

                   MY COLLEGE JOURNEY As I look back on the years gone by, I can’t be thankful enough for them. Professionally and personally, those are the best years I’ve had. Those college years (2016-2020) gaves me a lots of experiences, a lot of memories, a lots of life lessons, and so on. What did you learnt in those years? Can you describe it in one word? For me it is “GRATITUDE”. I discovered that having a deep sense of gratitude for all that you have in a life is a source of profound happiness. As I started my college for the first time in the month of August 2016. I was quiet afraid as I do not want to go the B.Pharm Degree course. But due to the some reasons I took a decision to go to the bachelors of pharmacy degree. From the very first day of my college admission to the till date the my journey of college was very interesting and distinct. On the 8th of July 2016 I took admission to the KVPS Institute of Pharmaceutic...

Journey of Master's: Lessons and Reflections

“Lao Tzu”, once rightly said, “The Journey of Thousand Miles Begins With a Single Step”   Today I’m at the stage of finishing my master's and heading towards a new phase of my life. I still remember the days when I’m in dilemma about choosing the next path of my career after my bachelor's. As my bachelor degree was nearing the finish, I was quite firm about doing my master as on a distance basis from the same institute. But due to the importunity of family members, I opted to go for the regular mode. I still remember the day when (30/1/2021) when I confirm my admission to the college and started my master’s college on regular basis from 5/2/2021 onwards.  Initially, the college was supposed to be on online mode due to the upsurge in COVID-19 cases. Up to June 2021, things are getting normal back. Due to COVID-19, the exam for the first two semesters of the first year was held in online mode (Sessional exams were offline mostly). As already our year has started quite late due t...

2025: A Year in a Nutshell

The time has come to say goodbye to 2025 and welcome 2026. This is the right time to look back at the year, think about what happened, and prepare for what is coming next. For the last two years, I have built a habit of reviewing my year and learning from it. This moment helps to remember what I did, what I missed, and what I still want to do. I truly believe this is the time to learn from the past and get ready for the future. Reflection is not only about success. It is also about emotions, mistakes, lessons, strength, and growth. So it is important to pause, think, and move ahead with better understanding. Like always, 2025 passed very fast. It feels like it just started and now it is ending. Every year teaches something. Sometimes it feels light and happy. Sometimes it feels heavy and difficult. But every year shapes us in some way. At the beginning of 2025, I had many resolutions. Some I completed, some I could not. That is completely fine. Life does not always follow our plans. Wh...